या पुढे शिवसेनेशी युती नाही : चंद्रकांत पाटील 

या पुढे शिवसेनेशी युती नाही : चंद्रकांत पाटील 

मुंबई : महाराष्ट्रातले सरकार केंव्हाही पडू शकेल ,मात्र ते पाडण्यात आम्हाला रस नाही.यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युतीही करणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रदेश भाजप अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ते आज पत्रपरिषदेत बोलत होते. 

महाराष्ट्रातील सरकारमधील तीन पक्ष दररोज वेगवेगळी वक्‍तव्ये करत असतात,त्यातील प्रत्येकाची दररोज वेगवेगळी भूमिका असते पण आम्ही त्या कोणत्याही वादात न पडता जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडणार आहोत असे ते म्हणाले. 

नवी मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात राज्यातील सर्व महत्त्वाची मंडळी हजर होती.पक्षविस्ताराच्या कार्यक्रमावर या वेळी चर्चा झाली. मध्यावधी निवडणुकीची वेळ महाराष्ट्रावर आली तर आम्ही केंव्हाही त्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

25 फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन 
तीन पक्षांच्या कारभारात कायदा व सुव्यवस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष होते आहे.महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.याचा निषेध करण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी राज्यातील तब्बल 400 महत्वाच्या ठिकाणी धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

या प्रत्येक ठिकाणी किमान 1 हजार कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी होतील.सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात हे आंदोलन असल्याचेही त्यांनी नमूद केले. विधीमंडळाच्या अधिवेशनात त्या वेळी सर्व आमदार आंदोलनासाठी सक्रीय असतील असेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com