चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चार जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात महसूल व वनविभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी शामलाल गोयल यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली आहे. अमरावती विभागीय आयुक्त पदावरून काही दिवसापूर्वी उचलबांगडी केलेले जे पी गुप्ता यांना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदावर पाठविण्यात आले असून या ठिकाणी असलेले अमिताभ जोशी यांना महसूल आणि वन विभागाच्या विशेष कार्य अधिकारी पदावर व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव पदावर असलेले राजेश कुमार यांची कामगार ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती केली आहे. 

जे. पी. गुप्ता अमरावती विभागाच्या आयुक्तपदी असताना तहसिहदारांच्या नियुक्‍त्यांवरून वाद निर्माण झाला होता. नियमबाह्य पध्दतीने तहसिलदारांच्या नियुक्‍त्या केल्याचा ठपका गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com