सरकारी कर्मचारी ठाकरे सरकारवर खूष : आता सर्व शनिवारीही सुटी

....
सरकारी कर्मचारी ठाकरे सरकारवर खूष : आता सर्व शनिवारीही सुटी

मुंबई  : ठाकरे सरकारने राज्यातील सुमारे वीस लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना खूष करून टाकले असून त्यांच्यासाठी येत्या 29 फेब्रवारीपासून आता पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यासाठी रोजच्या कामात 45 मिनिटांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालये बंद असतात. आता महिन्यातील सर्व शनिवारी राज्य सरकारची कार्यालये बंद राहतील. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकारचीही कार्यालये शनिवारी बंद राहतील. 

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता बदलण्यात आले असून त्याचे नाव " "बहुजन कल्याण विभाग" असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. त्यासाठी दोन कोटी रूपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com