महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाही, फडणविसांची भीष्मप्रतिज्ञा 

 महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाही, फडणविसांची भीष्मप्रतिज्ञा 

पुणे : " मी मैदान सोडून पळणाऱ्यापैकी नाही. महाराष्ट्रात पुन्हा भाजपच सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाही,'' अशी भीष्मप्रतिज्ञा भाजपचे फायरब्रॅंड नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. 

गेल्या काही दिवसापासून फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला पूर्णविराम देताना त्यांनी आपल्या विरोधकांना धक्का देत मी येथेच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही जोरदार तोफ डागली. यावेळी या संघटनेचे नेते विनायक मेटे उपस्थित होते. सत्ताधारी ठाकरे सरकार हे विश्वासघातकी असल्याचे टीकास्त्र सोडताना फडणवीस म्हणाले, "" महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. गेल्या तीन महिन्यापूर्वी सत्तेवर आलेले हे सरकार प्रामाणिक आहे ते यासाठी की आम्ही ज्या चांगल्या गोष्टी सुरू केल्या होत्या. त्याला त्यांनी स्थगिती दिली आहे. हे सरकार "प्रगती' सरकार नव्हे तर "स्थगिती' सरकार आहे.'' 

आम्ही सत्तेवर असताना आमच्या मनात कधीही बदल्याची भावना नव्हती. आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या चांगल्या योजनांना स्थगिती दिली नाही. विरोधी पक्षातील लोक आमच्याकडे कामे घेऊन येत असत आम्ही त्यांचीही कामे केली. आम्ही कोणालाही अपमानीत केले नाही. डूक धरली नाही. आमचं राजकारण हे संघर्षाचे राहिले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका असा इशारा ठाकरे सरकारला देताना ते म्हणाले, की तसे झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू ! 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com