संगमनेर (नगर) : राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विनापरवाना मोर्चा काढून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याच्या आरोपावरून, भारतीय जनता पक्षाच्या 30 जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विनापरवाना मोर्चा काढून, पोलिसांच्या प्रतिकाराला न जुमानता पुतळ्याचे दहन केले होते. या कृत्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहे.
गुन्हे दाखल झालेल्यांची नावे
काशिनाथ पावसे, रामचंद्र जाजू, मनोज जुंदरे, वैशाली तारे, हेमलता तारे, मेधा भगत, ज्योती भोर, ललिता मालुसरे, दीपक भगत, भारत गवळी, मनीषा पंधारे, दिनेश सोमाणी, दिलीप रावळ, अमोल रणाते, विकास गुळवे, संपत गेठे, शिवकुमार भांगरे, शिरीष मुळे, योगराजसिंग परदेशी, कल्पेश पोगूल, विनायक थोरात, दीपेश ताटकर, जगन्नाथ शिंदे, बाबासाहेब इंगळे, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर कर्पे, अशोक शिंदे, शैलेश फटांगरे, सचिन शिंदे, शरद मोरे, राजेंद्र सांगळे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.