दोन लाखांवरील कर्जदारांचा फेब्रुवारीअखेरीस निर्णय

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या सुमारे 29 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने बॅंकांकडून मागवून घेतली आहे. खरीप हंगाम काही महिन्यांवर राहिला असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे यादृष्टीने सरकारने नियोजन केले आहे.
 दोन लाखांवरील कर्जदारांचा फेब्रुवारीअखेरीस निर्णय

सोलापूर : दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द करुन मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा संपूर्ण लाभ देण्याचे नियोजन महाविकास आघाडी सरकारने केले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांच्या निर्णयासाठी नियुक्‍त अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात निर्णायक बैठक होणार आहे. राज्यातील 23 लाख 37 हजार कर्जदारांना खरीप हंगामात बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे, या हेतूने सरकारने पाऊल उचलले आहे. 

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या सुमारे 29 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने बॅंकांकडून मागवून घेतली आहे. खरीप हंगाम काही महिन्यांवर राहिला असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे यादृष्टीने सरकारने नियोजन केले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) लागू केली करुन त्याअंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून दिले जातील. तत्पूर्वी, त्यांना दोन लाखांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी काही बॅंकांचे व कृषीतज्ज्ञांचे अभिप्रायही या समितीने घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात बैठक होणार असून लवकरच समिती निर्णय जाहीर करेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द होईल. मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांच्या लाभासाठी मंत्र्यांची अभ्यास समिती नियुक्‍त केली आहे. समिती आपल्या निर्णयाची शिफारस शासनाला सादर करणार असून त्यानंतर शासन स्तरावरून काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे असे सहकार विभागाचे अप्पर आयुक्‍त डॉ. आनंद जोगदंड यांनी सांगितले. 
ठळक बाबी... 
- दोन लाखांवरील कर्जदारांच्या निर्णयासाठी अभ्यास समितीने घेतला कृषीतज्ज्ञांचा अभिप्राय 
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पुढील आठवड्यात निर्णायक बैठक 
- व्याजामुळे थकबाकी वाढल्याने 'ओटीएस'ची शक्‍यता : समितीच्या शिफारसीनुसार होणार शासन निर्णय 
- राज्यातील 23 लाख 37 हजार कर्जदारांना मिळणार खरीप हंगामापूर्वी दिलासा 
- दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची पहिली यादी 15 फेब्रुवारीनंतर : मेपर्यंत मिळणार लाभ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com