उद्धव ठाकरे यांचे भाषण `शिवाजी पार्क`सारखे : फडणवीस
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरून भाषण देत असल्यासारखे विधानसभेत बोलले. त्यांच्या भाषणात शेतकरी आणि विदर्भाच्या विकासाचा साधा उल्लेखही नव्हता. फक्त शाब्दिक कोट्या आणि टीकाटिप्पणी करून त्यांनी वेळ मारून नेल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडले. यात त्यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले. विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.
यावर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी त्यांच्या भाषाणाचा समाचार घेतला. ``अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. हिवाळी अधिवेशनाचे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र त्याबाबत साधा शब्दही काढला गेला नाही. "देणार आहोत' असे म्हणतात मात्र केव्हा हे सांगत नाहीत. मराठा आरक्षण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली नाही,असे त्यांनी सांगितले.
विदर्भात अधिवेशन होत असल्याने येथील विकासाबाबत काही घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याचा साधा उल्लेखही केला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी नाराज होणार नाही फक्त याचीच दक्षता घेतली जात आहे. सत्ता वाचविण्यासाठी दोन्ही पक्ष खुश राहतील, अशीच भूमिका शिवसेनेची असल्याचेही फडणवीस म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.