फडणवीसांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नाही : संजय राऊत 

फडणवीसांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नाही : संजय राऊत 

नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील, तर ती राज्याशी बेइमानी ठरेल. त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचादेखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या आठवड्यात बहुमताचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या कार्यकाळात विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारकडे असलेले चाळीस हजार कोटी रुपये परत केल्याचे वक्तव्य केले होते. 

त्यानुषंगाने राऊत म्हणाले, ""अनंतकुमार हेगडे यांनी केलेले वक्तव्य गंभीर असून, भाजपने जनतेसोबत धोका केला आहे. फडणवीस यांनी चाळीस हजार कोटी रुपये परत केले असतील, तर फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजप महाराष्ट्रातील जनतेचा गुन्हेगार आहे. परंतु, त्यांनी हेगडे यांनी केलेले वक्तव्य नाकारल्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू. मात्र, हेगडे यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आढळल्यास राज्याशी बेइमानी ठरेल. 

फडणवीस यांना विधानसभेची पायरी चढण्याचाही अधिकार नाही. पाच वर्षांत राज्य सरकारने न केलेल्या कामांच्या जाहिराती करून कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलाय तो आर्थिक गाडा रुळावर आणावा लागेल. शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुलेट ट्रेनला विरोध यापूर्वीही होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेतील.'' अजित पवार यांनी केलेल्या बंडाबाबत, "आता तो अध्याय संपल्या'चे वक्तव्य राऊत यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com