बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मुंबईहून परतल्यानंतर शनिवारी होम क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, संचारबंदीत जिल्हा हद्द सिल असतानाही त्यांनी प्रवेश केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.
जयदत्त क्षीरसागर शनिवारी दुपारनंतर कुटूंबियांसह मुंबईहून बीडला पोचले. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबईतून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर होम क्वारंटाईनसह संचारबंदीत जिल्हाहद्दीत प्रवेश केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.
दरम्यान, आपण खुद्द होम क्वारंटाईन राहूनच काम करणार आहोत. जिल्हा अडचणीत असताना मुंबईत कसा राहू शकतो. मी सर्व नियम पाळूनच काम करणार असल्याचे त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगीतले. दरम्यान, उशिरा पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांच्या घरी भेट दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.