गृहिणींना गॅस अन्‌ शेतीला पाणी पोहोचवता पोहोचवता आमदार झाले : निर्मला गावित 

पहिल पाऊल....आमदार निर्मला गावितमाहेरी बालपणापासून राजकीय वातावरणात वाढले. त्यामुळे नाशिकला आल्यावर तो पिंड कायम होता. गृहिनींना गॅस कनेक्शन देणं, नागरिकांना टेलीफोन मिळवून देणं अशी कामे करीत असताना लोकांनी आग्रह करुन 1997 मध्ये मला नगरसेवक केलं. इगतपुरी तालुक्‍यात आदिवासींच्या शेतीला पाणी मिळावं म्हणुन खुप खडतर परिश्रम केले. लोकांचे माळरान बहरले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मग लोकांनी मनावर घेतल्याने आमदार झाले...
गृहिणींना गॅस अन्‌ शेतीला पाणी पोहोचवता पोहोचवता आमदार झाले : निर्मला गावित 

नाशिक : माहेरी बालपणापासून राजकीय वातावरणात वाढले. त्यामुळे नाशिकला आल्यावर तो पिंड कायम होता. गृहिनींना गॅस कनेक्शन देणं, नागरिकांना टेलीफोन मिळवून देणं अशी कामे करीत असताना लोकांनी आग्रह करुन 1997 मध्ये मला नगरसेवक केलं. इगतपुरी तालुक्‍यात आदिवासींच्या शेतीला पाणी मिळावं म्हणुन खुप खडतर परिश्रम केले. लोकांचे माळरान बहरले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मग लोकांनी मनावर घेतल्याने आमदार झाले.... असे काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगत होत्या. 

काँग्रेसचे माणिकराव गावीत यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द आहे. पक्ष आणि श्रेष्ठींशी एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा आहे. जिल्हा परिषद सभापती, एकदा आमदार, सलग नऊ वेळा नंदुरबारचे खासदार म्हणुन त्यांनी काम केले. चार मुली, एक मुलगा असा त्यांचा परिवार. यातील निर्मला गावीत यांचे प्राथमिक शिक्षण नंदुरबारला, महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे झाले. पती रमेश गावीत पाटबंधारे विभागात अभियंता होते. विवाहानंतर त्या नाशिकला आल्या. तेव्हा वडिल खासदार असल्याने परिसरातील गृहिणी आणि अन्य लोक त्यांच्याकडे स्वयंपाकाच्या गॅस, टेलीफोन कनेक्‍शनसाठी येत. त्यांनी अनेकांना मदत केली. 1997 मध्ये स्थानिक प्रभाग आदिवासी राखीव झाल्यावर नागरीकांनी आग्रह केल्याने त्या महापालिकेत नगरसेवक म्हणुन निवडून गेल्या. ते निर्मला गावित यांचं राजकारणातले पहिल पाऊल होय. 

निर्मला गावित पुढे दोनदा नगरसेवक झाल्या. लोकसंपर्कातून देवमोगरा माता सेवाभावी संस्था स्थापन केली. धरणांचा तालुका असुनही पन्नास, पंचावन्न वर्षे माहितीअभावी उशाशी पाणी असतानाही येथील आदिवासी, गरीबांची शेती पाण्यापासून वंचीत होती. त्यांनी या संस्थेमार्फत विविध गावांत शासकीय खर्चात उपसा सिंचन योजना राबवल्या. इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी असे त्यांचे स्वप्न आहे. पती रमेशगावीत यांच्या मदत व मार्गदर्शन, स्थानीक नेते, नागरीक, कार्यकर्ते सगळेच आता त्यात त्यांना मदत करतात. 

त्यामुळे उपेक्षीत अशी प्रतिमा असलेल्या इगतपुरी तालुक्‍यातील लोकांचे जीवनमान उंचावले. या कामामुळे 2009 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. त्या आमदार झाल्या. राजकीय अनुभव त्यांना कामाला आला. त्यामुळे 2014 मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या. ''लोकांची कामे करत गेले. लोकांच्या आर्शिवादाने वाटचाल होत राहिली. जे जे शक्‍य आहे, ते प्रामाणीकपणे करावे आणि लोकसेवा करावी या उद्देशाने वाटचाल सुरु आहे," असे निर्मला गावित यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com