जळगाव : महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात 'महानंद'मध्ये गेल्या चार वर्षात राजकारण झालं, असा आरोप राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केला होता. मात्र त्याला छेद देत माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले, गेल्या चार वर्षात परिस्थिती अत्यंत दणकट झाली आहे. संघाला 'आयएसओ' प्रमाणपत्र मिळाले आहे.
गेल्या आठवड्यात राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार जळगावला आलेले असतांना त्यानी गेल्या पाच वर्षात 'महानंद'मध्ये राजकारणच झाल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी त्यावेळी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतु गेल्या चार वर्षात 'महानंद'वर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे चेअरमन होत्या.
आज खडसे यांना 'महानंद' संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला खडसे म्हणाले, गेल्या चार वर्षापूर्वी पंधरा वर्षे 'महानंद'ची परिस्थिती अत्यंत बिकट होती, संस्थेला उतरती कळा लागली होती. मात्र गेल्या चार वर्षापूर्वी सत्तातंर झाले. त्यानंतर 'महानंद'मधील असलेली बेशिस्त मोडून काढीत ती बळकट केली, संघाला 'आयएसओ' प्रमाणपत्र मिळाले आहे. आता संस्था अत्यंत चांगल्या स्थितीत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.