पवारसाहेबांना ईडीची नोटीस पाठविणे चुकीचे होते, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार 

पवारसाहेबांना ईडीची नोटीस पाठविणे चुकीचे होते, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार 

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांना ईडीची नोटीस पाठविणे चुकीचे होते असे सांगततानाच महाराष्ट्रात मस्तवालपणा चालणार नाही असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला आज दिला आहे. 

भाजपनं शिवसेनेला सोडून सत्ता स्थापन करावी. जर कोणाला असे वाटत असेल की आम्ही फोडाफोडी करून सरकार बनवू तर ते आता शक्‍य नाही. आता कोणत्याच पक्षाचा आमदार फुटणार नाही तसे वातावरण राज्यात आहे असेही ते म्हणाले. 

विधानसभा निकालानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्रिशंकू अवस्था आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला गेलो असलो तरी जे लोकसभेला ठरलं होतं ते आम्हाला मिळायला हव इतकीची आमची मागणी आहे. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी पत्र आमच्याकडे यावं आम्ही निर्णय घेऊ. 2014 पासून ते 2019 पर्यंत राज्यात जे काही घडलं ते चुकीचे होते.

शासकीय यंत्रणाचा उपयोग करून कोणी फोडाफोडी केली हे काही सांगण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना ईडीची नोटीस पाठविणे चुकीचे होते असेही ते म्हणाले. कोणताही पक्ष असो या राज्यातील जनता सुज्ञ आहे. येथे मस्तवालपणा चालणार नाही. 

या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी आणि त्यांच्या प्रमुख म्हणून पवारसाहेबांनी लोकांनी डोक्‍यावर घेतले आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसच्या पाचही जागा येणार नाहीत असे बोलले जात होते पण, काय झाले चाळीसपेक्षा अधिक जागा या पक्षाला मिळाल्या आहेत. म्हणजेच राज्यात काय झाले ? असा सवालही त्यांनी यावेळी केला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com