सीमा लढयातील शिवसैनिकांना शहिदांचा दर्जा द्या - एकनाथ शिंदे

....
सीमा लढयातील शिवसैनिकांना शहिदांचा दर्जा द्या - एकनाथ शिंदे

मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढयाच्या वेळी मुंबईत बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 1 नोव्हेंबर 1968 साली शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे सीमा बांधवांना पाठींबा देण्यासाठी बेळगावला गेले होते. यावेळी पुढच्या वर्षी सीमाबांधवांना काळा दिवस पाळावा लागणार नाही, असे शिवसेनाप्रमुखांनी आश्‍वस्त करत केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. 

सीमा प्रश्‍न तातडीने सोडवा अन्यथा केंद्रीय मंत्रयांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशाराही बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत मोरारजी देसाई यांना शिवसेनेतर्फे निदेशन दिले जाणार होते. मात्र शिवसेनेला त्यावेळी परवानगी नाकारण्यात आली. यावेळी मोरारजी देसाई यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता ताफ्यातील वाहने न थांबता शिवसैनिकांना चिरडत पुढे गेला. यावैळी 67 शिवसैनिक हुतात्मा झाले आणि त्यानंतर सीमा लढा आणखी तीव्र झाला. नंतर आठ दिवस मुंबईत हिंसाचार झाला. या सर्व घटनेची आठवण करून देत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या 67 शिवसैनिकांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com