सोनई : "भारतीय जनता पक्षाला सर्वत्र अच्छे दिन असताना, महाराष्ट्रात मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या म्होरक्यांमुळे पक्षाची अवस्था बिघडत आहे. कुणी कितीही रोखायचा प्रयत्न केला, तरी नाराजीचे चक्रीवादळ आजही घोंघावत आहे,'' असे रोखठोक मत माजी महसूलमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
खडसे यांनी काल परिवारासह शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदर्शन घेतले. त्या वेळी उदासी महाराज मठात त्यांनी "इडा पिडा टळो'चा अभिषेक केला. जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, ""मी भाजपवर नाराज नाही, तर पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मी माझ्या मनातील रोष व्यक्त करणारच आहे.''
"वेळ आल्यावर धमाका होणारच!'
पक्षाविरुद्ध बंड करणार का? या प्रश्नावर "वेळ आल्यावर धमाका होणारच आहे,' असे खडसे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याने ही खिचडी फार दिवस टिकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.