पुणे: "बालवाडीत 'क' कमळाचा असं ज्यावेळी शिकवायला सुरुवात झाली तेव्हाच भारतात कमळ फुलण्याची प्रकिया सुरू झाली. आज जे कमळ फुलले त्याची बीजे अंकलीपीत आहेत. 'क' करवताचा शिकवला गेला असता तर कष्ट करणाऱ्या श्रमिकांची किंमत वाढली असती, पण तसे झाले नाही," असे मत तुलनाकार, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डॉ. आनंद पाटील यांनी पुणे येथे बोलताना व्यक्त केले.
"मी पाटील असूनही माझ्या आयुष्यात कधीही डोक्यावर फेटा घातला नाही. फेटा घालणे म्हणजे आत्महत्येच्या दिशेने झालेला प्रवास आहे. फोटोसाठी फेटा आहे. माझ्यासारख्या एका पाटलाची इंग्रजीत दहा पुस्तके आहेत, हे पाटलांनाच माहिती नाही. इतका महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला आहे." असेही पाटील म्हणाले.
जालना येथे चौदा मार्चला होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंद पाटील यांची निवड झाली. त्यानिमित्ताने त्यांचा पुण्यात सत्कार झाला. यावेळी प्रतिमा परदेशी, सचिन बगाडे, मोहन वाडेकर उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले,"मराठी ही सडलेली आणि जातीयवादी भाषा आहे, असं माझं मत आहे. साहित्यात निव्वळ जातीयवाद चालतो. मराठीत सगळे स्वयंभू लेखक आहेत. या स्वयंभू म्हणवणाऱ्या लेखकांनी मराठी भाषेचे वाटोळे केले आहे. मराठी लेखकांना देण्यात येणारे पुरस्कार बंद केले पाहिजेत."अशी मागणी पाटील यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.