आठवलेना आठवत नाही, त्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही : गुलाबराव पाटील

 आठवलेना आठवत नाही, त्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही : गुलाबराव पाटील

जळगाव : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बोललेले काही आठवत नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. असे मत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यातील तीन पक्षांचे असलेले सरकार तीन पायांचे आहे, त्यामुळे ते जास्त दिवस टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल अशी प्रतिक्रीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. त्यावर पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्‍नाकडे उत्तर देतांना ते म्हणाले, आठवलेना काहीही आठवत नाही. त्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही.

कपडे बघून शाई टाकणे त्यांचा प्रश्‍न
जळगाव भारतीय जनता पक्षाच्या सभेत शाई फेकण्याच्या झालेल्या प्रकाराबाबत बोलतांना ते म्हणाले, त्यांच्या पक्षात कुणाचे कपडे बघून कुणीवर शाई फेकावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे. आपण त्यावर काय बोलणार

खडसे कायम संपर्कात
भाजप नेते एकनाथराव खडसे हे संपर्कात असल्याचे विधान पाटील यांनी केले होते, याबाबत ते म्हणाले, होय, एकनाथराव खडसे माझ्या कायम संपर्कात असतात, सद्याही संपर्कात आहेतच. परंतु पक्षा प्रवेशाशिवाय इतर गोष्टीवरही त्यांच्यांशी चर्चा होत असतेच.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com