आता सरकारकडून आणखी अपेक्षा करू नका : नितीन गडकरींचा साखर उद्योगाला स्पष्ट सल्ला

आता सरकारकडून आणखी अपेक्षा करू नका : नितीन गडकरींचा साखर उद्योगाला स्पष्ट सल्ला

पुणे : साखर कारखानदारी टिकायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉल, बायोडिझल यासारख्या उपपदार्थांची निर्मिती किफायतशीर ठरेल. या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने साखर कारखानदारी टिकवावी लागेल. सरकारने करायची तेवढी मदत केली आहे. आता सरकारकडून आणखी अपेक्षा करू नका, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

साखर की किफायतशीर उपपदार्थांची निर्मिती हे साखर कारखानदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य सहकारी बॅंकेच्यावतीने आयोजित साखर परिषदेचा समारोप आज झाला. यावेळी गडकरी यांनी साखर उद्योगापुढील समस्या, स्पर्धा आणि व्यावसायिक दृष्टीकोन या विषयावर भूमिका मांडली.

राज्यात साखर उत्पादन भरमसाठ झाले आहे. त्यामुळे साखरेला दर मिळत नाहीत. उत्पादन खर्च वाढत आहे. कारखाने कर्जबाजारी होत आहेत. या साऱ्यावर उपाय म्हणजे केवळ साखर उत्पादनाच्या नादाला न लागता इथेनॉल, बायोडिझल, बायोगॅस, सहवीज निर्मिती या उपउतपादनांवर भर देण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गडकरी हे तीन नेते साखर परिषदेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर होते. राज्यातील सहकारी कारखानदारांचे राज्यभरातील प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com