पराभवामुळे अंग झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे स्थिती आणखी बिघडेल : खुर्शिद 

 पराभवामुळे अंग झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे स्थिती आणखी बिघडेल : खुर्शिद 

नवी दिल्ली : आमचे नेते आम्हाला सोडून गेले आहेत, हीच सगळ्यांत मोठी चिंतेची बाब असल्याची खंत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली तसेच, निवडणुकीतील पराभवापासून नेत्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याच्या मुद्द्यावर पक्षात चिंतन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरराहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा 25 मे रोजी राजीनामा दिल्याचा संदर्भ खुर्शिद यांच्या बोलण्याला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पराभवामुळे राहुल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या मातुःश्रींना (सोनिया गांधी) पक्षाध्यक्षपद स्वीकारावे लागले. आता या महिन्यातील निवडणुकांनंतर पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल, अशी आशा खुर्शिद यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, "कांग्रेसची सद्यस्थिती चिंताजनक आहे. पराभवामुळे पक्ष आणि जबाबदाऱ्यांपासून अंग झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे स्थिती आणखी बिघडेल. त्यावर विचारवनिमयाची गरज आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाक्ष्यक्षपदी राहावे अशी विनंत आम्ही केली होती; पण तो त्यांचा निर्णय होता आणि आम्ही त्याचा स्वीकार करतो.

ते पदावर कायम राहिले असते, तर पराभवाच्या कारणांची चर्चा होऊन पुढील निवडणुकीत आणखी प्रयत्न करता आले असते. आता सोनिया गांधी अध्यक्षपदी आहेत; पण त्या तात्पुरत्या आहेत. महाराष्ट्र आणि हरियानाची 21 ऑक्‍टोबरची निवडणूक फार महत्त्वाची आहे.'' 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com