पुणे : ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यात त्यांचा दोष नाही. त्यामुळे त्यांच्याशी अन्याय्य वागू का, माणुसकीने वागा असा सूचना वजा सल्ला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोनाची लागण झाली आहे, अशा रूग्णांना चुकीची वागणूक दिली जात असल्याच्या काही घटना राज्यात समोर आल्या आहेत. पुण्या-मुबंईतून गावाकडे गेलेल्या लोकांकडे संशयाने पाहिले जात आहे. हेदेखील चुकीचे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
ज्यांना लागण झाली आहे. संसर्ग झालाय त्यात त्या व्यक्तींची व्यक्तीश: कोणतीच चूक नाही.अशाप्रकारे कुणालाही लागण होऊ शकते म्हणून प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. अशावेळी ज्याला लागण झाली त्या व्यक्तीस वाळीत टाकल्यासारखी वागणूक देणे अगदीच चुकीचे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. या प्रकाराची वागणूक देणे खरेतर कायद्याने गुन्हा आहे. अशी वागणूक देणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. लागण होऊ नये, म्हणून तुम्ही काळजी घेऊ शकता. मात्र, अशा रूग्णांना अपमानकारक वागणूक देऊ शकत नाही. असे केले आणि संबंधित रूग्णांने तक्रार केली तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
पुण्या-मुबंईतून गावाकडे गेलेल्या नागरीकांना गावबंदी करणे किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या काही घटना गेल्या दिवसात राज्यातून समोर आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर टोपे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. पुण्या मुंबईतून आलेल्या व्यक्तींपैकी कुणी आजारी असेल तर अशा व्यक्तींनी काळजी घेणे आणि त्यांनी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी, ही गावकऱ्यांची मागणीदेखील योग्य आहे. मात्र, आपल्याच गावातील अशा व्यक्तीला वाळीत टाकणे किंवा त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अन्यायकारक तर आहेच शिवाय कायद्याने हा गुन्हादेखील असल्याची जाणीव टोपे यांनी करून दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.