प्रकाश आंबेडकर, मेवाणी, कोळसे-पाटलांचे ब्रेनमॅपिंग करा : भिडे

संभाजी ब्रिगेडने नावे दिली म्हणून ऍड. आंबेडकरांनी आमची नावे घेतली. त्यांनी चौकशी करावयास हवी होती. मला अटक केली तरी, दंगलीचा प्रश्‍न सुटणार नाही. ही मंडळी विद्वेषातून पेटलेले आहेत. वास्तविक ज्यांची चौकशी झाली पाहिजे अशी माणसे वेगळीच आहेत. हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला.
प्रकाश आंबेडकर, मेवाणी, कोळसे-पाटलांचे ब्रेनमॅपिंग करा : भिडे

सांगली : राज्यात गेल्या तीन जानेवारीस बंद काळात झालेल्या जातीय दंगलीस ऍड. प्रकाश आंबेडकर, आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील जबाबदार असून त्यांचे ब्रेनमॅपिंग करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी 28 मार्चला सांगलीत जाहीर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी आज जाहीर केले.

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी श्री भिडे यांना अटक न केल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा ऍड आंबेडकर यांनी नुकताच दिला आहे. श्री भिडे म्हणाले, " पुण्यात एक जानेवारीस एल्गार परिषद झाली. त्यावेळी वरील सर्व नेत्यांनी भडक भाषणे केली. त्यानंतर तीन जानेवारीस पुकारलेल्या बंद नंतर सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली. या परिस्थितीस आंबेडकर जबाबदार असल्याचा संशय आहे. त्यावेळी झालेल्या जातीय दंगलीस या सर्व नेत्यांना जबाबदार धरुन तातडीने अटक करावी. या दंगलीत सुमारे 97 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्याची भरपाई शासनाने न करता प्रकाश आंबेडकर आणि एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून वसूल करावी.'' 


ते म्हणाले, "" वढू बुद्रुक गावात मी गेली 4-5 वर्ष फिरकलोही नाही. त्यामुळे तेथे झालेल्या घटनेशी माझा काही संबंध नाही. तरीही माझे नाव त्यामध्ये घेतले गेले. संभाजी ब्रिगेडने नावे दिली म्हणून ऍड. आंबेडकरांनी आमची नावे घेतली. त्यांनी चौकशी करावयास हवी होती. मला अटक केली तरी, दंगलीचा प्रश्‍न सुटणार नाही. ही मंडळी विद्वेषातून पेटलेले आहेत. वास्तविक ज्यांची चौकशी झाली पाहिजे अशी माणसे वेगळीच आहेत. हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे. केवळ मतांचा हिशोब होतोय. दलितांची मते घेण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग केला जात आहे.''


ते म्हणाले, ``या प्रकरणात आंबेडकरांची चौकशी झाली पाहिजे. मला दगड मारताना पाहिले अशी माझ्या नावाने खोटी फिर्याद देणाऱ्या महिलेची चौकशी झाली पाहिजे. तिचा बोलविता धनी कोण याचा तपास करावा. तिचेही ब्रेनमॅपिंग करावे. कोरेगाव भीमा येथील गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक कोणी लावला? त्यांचा हेतू काय होता? याची चौकशी करावी.'' 
यापुढे राज्यातील सर्व जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी सांगितले.

यावेळी अविनाश सावंत, मिलींद तानवडे उपस्थित होते.

संभाजीराव काय म्हणाले?

शंभूराजेंच्या समाधी जीर्णोध्दारासाठी जाणाऱ्या एकबोटेंची दंगलीशी संबंध जोडणे चुकीचे 

दंगलीनंतर अडीच महिन्यानंतरही सरकार या प्रकरणी निवेदन का करीत नाही? 

माझ्या बदनामीचा कट,मात्र मला त्याची खंत-दु:ख नाही. ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे तो वागतो 

डाव्या नक्षलवादी संघटनांशी संबंधितांनी माझ्या बदनामीचा कट रचला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com