निवडणूक झाल्यापासून माने आमच्याकडे आलेच नाहीत : विजयकुमार देशमुख

विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेच्याच लोकांनी पक्षाचे काम केले नाही. 'मध्य'मधील भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मित्रपक्षाचे काम केले आहे. -विजयकुमार देशमुख
vijay deshmukh sol
vijay deshmukh sol

सोलापूर :  मागील 30 वर्षापासून असलेली भाजप-शिवसेनेची युती राहावी अशीच आपली इच्छा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदामध्ये आपल्याला स्वारस्य नाही. त्यावेळच्या परिस्थितीमुळे आपल्याला ते पद मिळाले आहे. वेळ आली तर आपण त्वरित त्या पदाचा राजीनामाही देऊ, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.

सलग चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा आज श्रमिक पत्रकार संघामध्ये वार्तालाप आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. 

विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेच्याच लोकांनी पक्षाचे काम केले नाही. 'मध्य'मधील भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मित्रपक्षाचे काम केले आहे. याबाबत माजी आमदार दिलीप माने यांनी तक्रार केल्याचे आपल्याला माहीत नाही. पण, आमच्याच लोकांनी युती धर्म पाळला आहे. निवडणूक झाल्यापासून माने आमच्याकडे आलेच नाहीत, असेही देशमुख यांनी सांगितले.  

महापालिका व जिल्हा परिषदेतही आमचीच सत्ता येईल. जिल्हा परिषदेत आमच्या पक्षाच्या विचाराचाच अध्यक्ष होईल. महापालिकेत भाजपला 49 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौर आमचाच होईल असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

बाजार समितीमध्ये महाशिवआघाडी झाली तरी याठिकाणी काही बदल घडेल असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले, शहर उत्तर मधून आपण चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो. त्यापैकी दहा वर्ष विरोधाची भूमिका पार पाडली. मागील पाच वर्ष पालकमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात शहरासाठी आपण खूप निधी दिला. 

महापौर निवडीचे अधिकार शहराध्यक्ष आणि भाजपच्या कोअर कमिटीला दिले आहेत. त्यामुळे कोअर कमिटीमध्ये ज्या नावावर शिक्कामोर्तब होईल ,तो महापौर म्हणून काम पाहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत. त्या कामांना गती येईल. गेल्या 25 वर्षांत विकासापासून वंचित राहिलेल्या हद्दवाढ भागातील शेळगी, विडी घरकूल, दमाणीनगर या सारख्या काही भागात खूप निधी दिला आहे. अजूनही काही कामे शिल्लक आहेत. ती कामे पूर्ण केली जातील असेही त्यांनी सांगितले.

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी रिंगरूट मार्ग आणि उड्डाणपुलाची आवश्‍यकता असून त्यादृष्टीने कामे सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या दर्जाबाबत विचारले असता याबाबत समितीकडे चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले.
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com