एल्गार परिषद, कोरेगाव भीमाबाबत पवारांची माहिती चुकीची : फडणवीस

एल्गार परिषद, कोरेगाव भीमाबाबत पवारांची माहिती चुकीची : फडणवीस

पुणे : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती व संघटनांवर ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय मंत्री असलेल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी पहिली कारवाई केली होती. राज्यातले त्यांचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात सुधीर ढवळे यांना पहिली अटक झाली होती. त्यामुळे शरद पवार यांना काही लोक चुकीची माहिती देत आहेत, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात सांगितले. 

एल्गार परिषद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने निकाल दिला आहे. बहुसदस्यीय खंडपीठ ज्यावेळी निकाल देते त्यावेळी ज्या भूमिकेच्या बाजूने अधिक न्यायमूर्ती असतात. त्यांनी घेतलेला निर्णय निकाल मानला जातो. एखाद्या न्यायमूर्तीचे मत वेगळे असेल तर त्याची निकालात दखल घेतली जाते. या संदर्भात पवार यांनी नेमकी एका न्यायमूर्तींची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एल्गार परिषद म्हणून या साऱ्या प्रकरणाचा तपास केला जात नाही. संबंधितांच्या एकूण भूमिका व कारवायांच्या माहिती घेऊनच पोलीस कायद्याला धरून काम करीत असतात. पवार यांच्या या भूमिकेमुळे पालिसांचे मनोधैर्य खचू शकते, त्यामुळे पवार यांनी नेमकी माहिती घ्यावी, असे फडरवीस यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "" सरकारने केलेली ही उधारीवरील कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची तसेच 94 लाख हेक्‍टरवरील नुकसानग्रस्त शेतीला दर हेक्‍टरी 25 हजार रूपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनी त्यांचा शब्द पाळावा ही आमची मागणी आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com