जी मिळत नाहीत, ती द्राक्षे आंबट अशी राष्ट्रवादीची अवस्था - देवेंद्र फडणवीस

 जी मिळत नाहीत, ती द्राक्षे आंबट अशी राष्ट्रवादीची अवस्था - देवेंद्र फडणवीस

पुणे : महिन्याभरापूर्वी ज्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शिवसुराज्य यात्रा काढणार होती. त्यांच्यातील दोष ते भाजपात आल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीला कसे काय दिसू लागले, असा प्रश्‍न करून जी द्राक्षे मिळत नाहीत, ती आंबट, अशी सध्या राष्ट्रवादीची गत झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

महाजनादेश यात्रेदरम्यान पुण्यात बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "" गेल्या महिन्यात छत्रपती उदयनराजे राष्ट्रवादीत होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले होते. त्यावेळी पक्षाच्यादृष्टीने महत्वाचे असलेले उदयनराजे भाजपात आल्यानंतर लगेच चुकीचे वाटू लागले. त्यांच्यात कसे दोष दिसू लागले.'' 

मुख्यमंत्री म्हणाले, "" आम्ही केवळ राजकारण करीत नाही. महाराष्ट्राच्या चौफेर विकासाचे आमचे स्वप्न आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू असून त्यात निश्‍चितपणे यशस्वी होऊ. येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना व इतर घटक पक्षाच्या महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या पाच वर्षात अनेक योजना मार्गी लावल्या. एकट्या पुण्यातच 45 हजार कोटी रूपयांच्या योजनांची कामे सुरू आहे. या शिवाय अन्य योजानांवर काम सुरू आहे. विकासाचे सकारात्मक राजकारण ही आमची भूमिका आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांचे काम घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com