माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच जनतेने 'त्यांना' घरचा रस्ता दाखवला : फडणवीस  

पंधरा वर्ष राज्यात सत्ता असतांना त्यांना जनतेचा विसर पडला. केवळ माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. -देवेंद्र फडणवीस
cm-In-Aurangabad-
cm-In-Aurangabad-

औरंगाबादः राज्यात आणि देशात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था वाईट आहे. त्यांचा विरोधी पक्ष होईल एवढी संख्या देखील त्यांच्याकडे नाही. पण आपल्या अपयशाच खापर ते ईव्हीएमवर फोडत आहेत.

हा प्रकार म्हणजे एखाद्या बुद्धू मुलाने अभ्यास न करता परीक्षेला बसणे आणि नापास झाल्यावर वडीलांना पेनच खराब होता असे म्हणण्या सारखे आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था सध्या अशाच नापास झालेल्या मुलासारखी झाली आहे. जो आपल्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरतो आहे अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. तत्पुर्वी भव्य रोड शो काढण्यात आला. सभेला मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. 

फडणवीस म्हणाले, महाजनादेश यात्रेच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून यात्रा काढल्या जात आहेत. पण लोकच येत नसल्याने त्यांना या यात्रा मंगल कार्यालयात भरवाव्या लागत आहेत.

पंधरा वर्ष राज्यात सत्ता असतांना त्यांना जनतेचा विसर पडला. केवळ माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. म्हणून 2014 आणि आता 2019 मध्ये देखील केंद्रात त्यांच्या विरोधी पक्ष नेता नाही. महाराष्ट्रात देखील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल एवढे आमदार निवडून  येणार नाही. हारले तरी सुधरले नाही, जनतेत जात नाही, त्यांची माफी मागत नाहीत असा टोला देखील फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 

ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले. 2004 ते 2014 दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडून  आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस म्हणाले. 

महाजनादेश यात्रेवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नावर देखील फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपमध्ये यात्रेची परंपरा आहे. आम्ही विरोधात असलो तर जनतेसाठी संघर्ष करतो, म्हणून संघर्ष यात्रा काढतो. गोपीनाथ मुंडे यांना काढलेल्या संघर्ष यात्रेतूनच राज्यातील कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता गेली होती. आता आम्ही सत्तेत आहोत, पाच वर्ष केलेली काम जनतेपर्यंत पोचवून पुन्हा त्यांचा जनादेश मिळवण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com