भाजप लोकसभेत 330 जागा जिंकणार : फडणवीस

.
cm-Fadnavis.
cm-Fadnavis.

मुंबई : " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दमदार कामगिरी करीत आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार आणि एनडीएचे सरकार केंद्रात पुन्हा येणार", असा आत्मविश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जागवला. भाजप शक्तिकेंद्र प्रमुख संमेलनात ते बोलत होते.

ते म्हणाले, "ही निवडणूक भाजपची नसून भारताची निवडणूक आहे. ही एक देशाच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासातील ऐतिहासिक संधी आहे. यापूर्वी 2009 मध्ये केंद्रात कॉंग्रेसचे खिचडी सरकार आले होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना वेळ लागत होता. निर्णय घेतला जात नव्हता. त्यावेळी आपण वेळकाढू सरकार बघितले."

" मात्र त्यानंतर पाच वर्षांतच नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. या पाच वर्षांत मोदींनी अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे या देशाच्या इतिहासात 2020 ते 2025 हा सुवर्णकाळ आहे. ही संधी दवडता कामा नये. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद यांच्या "अग्निपंख' या पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे भारत 2020 ते 2030 या काळात जागतिक महासत्ता बनेल," असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com