जळगाव: अभ्यास करायचा नाही,आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा अशा बुध्दू मूलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे. सत्तेत असतांना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून त्यांना मतदान देत नाही.त्यामुळे त्यांचा पराभव होतो, परंतु ते दोष मात्र 'ईव्हीएम' ला देत असतात असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. जळगाव येथे महाजनादेश यात्रेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेचा आर्शिवाद घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. राज्यात आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती वाईट झालेली आहे. जनता त्यांना मते देण्यास तयार नाही, परंतु ते ईव्हीएम ला शिव्या देत आहेत. सत्तेत असतांना त्यांनी जनतेची कामे केली नाही, आता विरोधात असतांनाही ते केवळ आपल्या संस्था सांभाळत आहेत. त्यामुळे जनतेला आता सर्व समजले असून जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. ईव्हीएम मतदान देत नाही, व्यक्ती मतदान देतो त्यामुळे ईव्हीएम शिव्या देवून काहीही होणार नाही. त्यांनी जनतेत गेले पाहिजे.
कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नेते येत आहेत. त्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधक आमच्या मेगा भरतीबाबत विचारत आहेत. मात्र त्यानीं आमच्या भरतीचा विचार करण्यापेक्षा त्यांच्यात होणाऱ्या गळतीचा विचार केला पाहिजे. आज या पक्षात राहण्यास कोणीही तयार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.