सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य!

मंगळवेढ्यातील संत दामाजी आणि बसवेश्‍वर महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू होईल. त्यासाठी आवश्‍यक तो निधी आणि पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नका -देवेंद्र फडणवीस
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य!

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १०) मंगळवेढा येथे दिले. 

भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी आयोजित मंगळवेढ्यातील प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार सुधाकर परिचारक, माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष आज गलितगात्र झाला आहे. त्यांना काय करावं, हे कळेनासं झालं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य आणि वस्तुस्थितीला धरुन आहे की आम्ही आता पार थकलो आहोत. त्यामुळेच आमच्याशी लढण्यासाठी विरोधकच राहिला नाही.’’ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com