कोणत्याही उद्योजकाला त्रास झाला तर 24 तासांत मदत : फडणवीस

सुपे येथे भयमुक्त औद्योगिक वसाहत उभारणार.
कोणत्याही उद्योजकाला त्रास झाला तर 24 तासांत मदत : फडणवीस

पारनेर (नगर) : 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून महाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र निर्माण होणार आहे. विदेशी उद्योजकांना राज्यात उद्योग उभारणीस अनकुल वातावरण आहे. आम्ही त्यांना पाहिजे ते सहकार्य करत आहोत. सुपे येथे भयमुक्त औद्योगिक वसाहत उभारण्याचा आमचा मानस असून, कोणत्याही उद्योजकांना त्रास झाला तर मी चोवीस तास त्यांना मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुपे औद्योगिक वसहतीत मायडीया टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते भूमिपुजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मायडिया ग्रुपचे संस्थापक शिंगजियान, अध्यक्ष पॉल फंग, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, राज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व उद्योगांसाठी अनुकुल वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्योगासाठी व गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र प्रथम  पसंतीचे ठिकाणी बनले आहे. मायडीया या टेक्नॉलॉजी पार्कमध्ये गृहपयोगी उकरणे एअरकंडिशन, राफ्रीजेटरचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी या सुपा औद्योगीक वसाहतीतील ६८ एकर परिसरात कॅरीअर व तोशीबा या दोन कंपण्या उभ्या राहात आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com