25 वर्षे मोदींची सत्ता राहणार: फडणवीस

तुमचा जनादेश घेवुन मुंबईत जातो आणि पुन्हा सरकार स्थापन करुन तुमच्या भेटीला येईल- देवेंद्र फडणवीस
25 वर्षे मोदींची सत्ता राहणार: फडणवीस

पाथर्डी (नगर) : येणारी पंचवीस वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात भाजपाची सत्ता राहील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पाथर्डी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजीत सभेत फडणवीस बोलत होते. 

पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजीतसिंग ठाकुर, मोनिका राजळे, बबन पाचपुते, दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे उपस्थीत होते. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पाथर्डीत आल्यावर दोघांची आठवण मला येते. स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे पाथर्डी तालुक्यावर विशेष प्रेम होते. मुंडेच्या बोटाला धरुनच आम्ही राजकारणात आलो. त्यांनी आम्हाला संघर्ष करण्याची शिकवण दिली. माझे मित्र स्वर्गीय राजीव राजळे व मी विधानसभेत असताना आमची मैत्री जमली. त्यांची आठवण मनाला वेदना देते. राज्याला वारी व यात्रेची परंपरा जुनीच आहे. पंढरपुरच्या यात्रेला जाऊन आपण आपल दैवत विठोबाचं दर्शन घेतो. त्याप्रमाणे जनता हे आमचं दैवत आहे आणि दैवताच्या दर्शनासाठी मी राज्यभर महाजनादेश यात्रा करतोय.  

प्रस्ताविक आमदार मोनिका राजळे यांनी करुन पाथर्डी -शेवगाव मतदारसंघातील दुष्काळी जनतेला शेतीला पाणी देण्यासाठी पाटाचे पाणी द्यावे व ताजनापुर योजनेला दिडशे कोटीचा निधी देण्याची मागणी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com