मुंबई: 'मी पुन्हा येईन' ही कवितेची साधी ओळ आहे, त्यात कुठेही गर्वाचा दर्प नव्हता, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी फडणवीस बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला का, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "मी पुन्हा येईन' ही कवितेची साधीशी ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली आणि त्यामुळे ती सर्वत्र पसरली. 'मी पुन्हा येईन'ला कुठेही गर्वाचा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी "मी पुन्हा येईन', अशी माझी भावना होती.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर माध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही 70 टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, 44 टक्के मते मिळवणारे एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.