मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली. ते म्हणाले, 27 नोव्हेंबरला राजभवनावर शपथविधी होण्यापूर्वी अजित पवार हे आमच्याकडे आले. त्यांनी कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणे शक्य नाही, असे मत मांडले. राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. स्थिर सरकार फक्त भाजपसोबतच देता येऊ शकते. कारण, त्यांच्याकडील आमदारांचा आकडा मोठा आहे, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांसोबत चर्चा केली होती, असेही फडणवीस म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.