मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडवला  पोट खराब शेतजमिनींचा  प्रश्न 

मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात खाजगी पत्रव्यवहाराद्वारे हा विषय निदर्शनास आणला. मुख्यमंत्री, महसुलमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन निर्णय घेतला. लाखो शेतक-यांना त्याचा फायदा होईल ..- रघुनाथ कुवर, सामाजिक कार्यकर्ते.
cm-&-chandrakant-dada
cm-&-chandrakant-dada

मालेगाव  : राज्यातील लाखो शेतक-यांच्या जमिनीलगत पोट खराबा आहे. कसता येणारी जमीन असली तरी त्याची नोंद नसल्याने नुकासान होते. पत्रव्यवहारातुन लक्ष वेधल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिर्घकाळ रेंगाळलेला हा प्रश्न सोडवला आहे. यानिमित्ताने निवृत्त तहसीलदार रघुनाथ कुवर यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या आकाशवाणी उदबोधन कार्यक्रमात  महसूल विभागाकडे पोट खराब क्षेत्राबाबत पाठपुरावा झाला होता. त्या पाठपुराव्याला यश आले.

18 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्राम पातळीवरील महसूल लेखांकन करण्याकरिता स्वतंत्र निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून पोटखराबा क्षेत्राची नोंद 8 (अ) ला घेण्याचे सुतोवाच संबंधितांना केले आहे. यामळे पोटखराब क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट होईल. मात्र त्यावर कुठलीही कर आकारणी लागू होणार नसल्याने राज्यातील चार ते पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com