प्रशासन का हलत नाही ? मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर भडकले 

प्रशासन का हलत नाही ? मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर भडकले 

भीमा कोरेगाव आणि मराठा मोर्च्यातील आंदोलकांवरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे नसतील तर मागे घेतले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली 13 मार्च रोजी. त्या घटनेला आता महिने लोटले पण हालचाल अशी ती झाली नाहीच. गृह विभागाच्या आढाव्याची बैठक आयोजित झाली तेंव्हा गुन्हे मागे घेण्याचा विषय निघाला.यासंबंधात कोणतीही हालचाल झाली नाही केवळ दोनदा परिपत्रके तेवढी काढली गेली आहेत हे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले.

खऱे तर ते कमालीचे शांत आणि संयत.पण अशा महत्वाच्या घोषणा प्रत्यक्षात येत नसल्याने मला खोटे पडायची वेळ येईल. प्रशासन हलत का नाही असा प्रश्‍न त्यांनी दहा महत्वाच्या अधिकाऱ्यांसमोर केला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रणजित पाटील दोघेही हजर होते. मुख्यमंत्री जाहीरपणे वैताग कधी नव्हे ते दाखवते झाल्याने सारेच हतबुध्द झाले, आता पुन्हा एकदा गुन्हे मागे घेण्यासाठी समिती स्थापण्यात आली आहे. ही समिती किती दिवस घेते अन कितीजणांना वैतागवते ते आता दिसेलच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com