रावसाहेबांपाठोपाठ चंद्रकांतदादा भाजपचा विजयरथ पुढे नेतील, देवेंद्र फडणवीसांना विश्वास 

रावसाहेबांपाठोपाठ चंद्रकांतदादा भाजपचा विजयरथ पुढे नेतील, देवेंद्र फडणवीसांना विश्वास 

मुंबई : रावसाहेबांपाठोपाठ, भाजपचा विजयरथ चंद्रकांतदादा पुढे घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करतानाच माझ्यात दैवीशक्ती आहे असे म्हटले जाते हो माझ्यात दैवीशक्ती आहे. ती शक्ती माझ्यासमोर (जनता) बसली आहे. मी राजकारणात आहे.  मुख्यमंत्री आहे पण, मला कमवायचं काहीच नाही त्यामुळे माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यासपिठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की गेल्या पाच वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांना मी काहीच देऊ शकलो नाही. पुढे काही देऊ शकेल असे वाटत नाही. पण, पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला बलशालीला बनविण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे याचा मला अभिमान आहे.

रावसाहेब दानवे यांनी गेल्या पाच वर्षात राज्यात उत्तम नेतृत्व केले. काही वेळा काही प्रसंग आले मात्र रावसाहेबांनी मदत केली त्यामुळे दानवेंचे आभार मानतो. आता दानवे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ते मोदी यांना साथ देण्यसाठी दिल्लीत गेले आहेत. आता त्यांच्या जागी चंद्रकांतदादा आले आहेत ते भाजपचा विजयरथ असा पुढे नेतील असा मला विश्वास आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com