राज्यपालांना धक्काबुक्की! भाजपचा आरोप अन् मुख्यमंत्र्यांनी थेट गाठलं राजभवन

पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी भाजप आमदारांच्या गदारोळामुळे राज्यपालांना भाषण न करताच परत जावे लागल्याचा प्रकार घडला आहे.
Mamata Banerjee meets Governor Jagdeep Dhankhar
Mamata Banerjee meets Governor Jagdeep DhankharSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी भाजप आमदारांच्या गदारोळामुळे राज्यपालांना भाषण न करताच परत जावे लागल्याचा प्रकार घडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की गेल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या गदारोळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे अधिवेशनाचा (Assembly Session) पहिलाच दिवस अनेक राजकीय घडामोडींमुळे गाजला.

सोमवारी अधिवेशनाला सुरूवात होताच भाजप आमदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करून जोरदार गोंधळ घालण्यास सुरूवात केली. गदारोळामुळे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना भाषण करता आले नाही. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही त्यांना थांबण्याची विनंती केली होती. या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले.

Mamata Banerjee meets Governor Jagdeep Dhankhar
राज्यपालांनी हात जोडूनही थांबले नाहीत भाजप आमदार अन् भाषण न करताच जावे लागले!

अधिकारी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल धनखर यांना धक्काबुक्की केली. सभागृहामध्ये काय घडलं, हे सर्वांनीच पाहिले आहे. आम्ही याबाबत राज्यपालांची भेट घेऊ. त्यांनी योग्य ती कारवाई करायला आहे. गरज भासल्यास आम्ही केंद्र सरकारचाही सल्ला घेऊ, असं स्पष्ट करत अधिकारी यांनी तृणमूलवर निशाणा साधला. त्यानंतर अधिकारी व भाजपचे आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले.

दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर ममता बॅनर्जी यांनीही तातडीनं राजभवन गाठलं. राज्यपालांची भेट घेत त्यांनी सभागृहात झालेल्या प्रकाराबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या प्रकारानंतर भाजपनेही तृणमूलवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराला भाजप आमदारांनी योग्यप्रकारे उत्तर देल्याचे भाजपचे नेते दिलीप घोष यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनावरून झाला होता वाद

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांना समंतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये टायपिंगच्या चुकीमुळे 7 मार्च रोजी 2 पीएमऐवजी 2 एम असे टाईप करण्यात आले होते. त्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन 7 मार्चला मध्यरात्री 2 वाजता होणार होते. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज पहाटे 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल, असेही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना राज्यपाल यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले होते. यावर विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी म्हटले होते की, ही टायपिंगची चूक आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती. राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते. मात्र, त्या ठिकाणी चुकीने पहाटे 2:00 पर्यंत झाले. राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com