हाथरसमधील पीडितेचे कुटुंबीय म्हणतात, आम्हाला रात्री बाहेर नेऊ नका..दिवसा कधीही न्या!

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात मोठा गदारोळ उडाला आहे. या प्रकरणाने उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
we will not travel during night says family of hatharas victim
we will not travel during night says family of hatharas victim

लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतला आहे. या प्रकरणी पीडितेचे कुटुंबीयांना उद्या (ता.12) हजर करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याचे सांगून रात्री प्रवास करण्यास ठाम नकार दिला आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर उद्यापासून (ता.१२) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीस पीडितेचे कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीला पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

उच्च न्यायालयात हजर होण्यासाठी आज रात्री घरातून बाहेर पडण्यास पीडितेच्या कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.  जिवाला धोका असल्याने रात्री घर सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी त्यांना उद्या पहाटे 5.30 वाजता अलाहाबादला जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. सरकारने पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणासाठी 60 पोलीस तैनात केले आहेत. याचबरोबर पीडितेच्या घराभोवती आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  

पीडितेच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी बोलताना हाथरसचे पोलीस अधीक्षक विनित जयस्वाल म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात नेण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. कुटुंबीयांनी पूर्ण सुरक्षेत उद्या न्यायालयात नेले जाईल. हाथरस ते लखनौ प्रवासात त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी असतील. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करुन सीबीआयकडे तपास सोपवला आहे. आता सीबीआयने हा तपास हाती घेतला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com