विरोधकांचं पानिपत; लखीमपूर खीरीनं दिला जोरदार झटका

मागील वर्षी लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात विरोधकांनी भाजपला घेरलं होतं.
Lakhimpur Kheri
Lakhimpur KheriSarkarnama

लखीमपूर खीरी : मागील वर्षी लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विरोधकांनी भाजपला घेरलं होतं. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालत चिरडल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली होती. मुलाला अटक झाल्यानंतर मंत्र्याच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. या घटनेचा भाजपला (BJP) निवडणुकीत फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण हे अंदाज फोल ठरवत मतदारांनी विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. (UP Election Result)

लखीमपूर खीरी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघात भाजपला एकही मतदारसंघात विजय मिळाला नव्हता. या घटनेमुळे यंदाही हेच चित्र पाहायला मिळेल, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर अगदी उलट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Lakhimpur Kheri
मोन्सेरात यांचं मोठं वक्तव्य; भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला

लखीमपूर मतदारसंघासह पलिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, कसता आणि मोहम्मदी या मतदारसंघातील मतदारांनी भाजपलाच साथ दिली आहे. या मतदारसंघामध्ये कुठल्याच पक्षाचा करिष्मा चालला नाही. भाजपच्या उमेदवारांना पडलेल्या भरघोस मतदानावरून घटनेचा कसलाही परिणाम निवडणुकीवर झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. विरोधकांनी निवडणुकीतही या घटनेचा मुद्दा उचलून धरला होता. भाजपसह योगी सरकारला या मुद्दावरून घेरण्यात आलं होतं. पण मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकलं.

अखिलेश एकटेच लढले

उत्तर प्रदेशातील योगी सरकारला खाली खेचण्यासाठी समाजवादी पक्षासह (Samajwadi Party) बसपा व काँग्रेसनंही जोर लावला होता. पण विधानसभा निवडणुकीच्या निकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवत विरोधकांवर मात केली. मतमोजणीतील आकड्यांकडे नजर टाकल्यास या लढतीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदींना जोरदार टक्कर दिल्याचे दिसते. तर बसपा आणि काँग्रेसची धुळधाण उडाली आहे.

Lakhimpur Kheri
भाजपनं इतिहास रचला; योगी मोडणार 37 वर्षांची परंपरा

उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजप 254 जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पक्षाला 112 उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. काँग्रेस व बसपाचा सुफडा साफ झाला असून दोन्ही पक्षांना अनुक्रमे दोन व एका जागेवर आघाडी आहे. अपना दल व राष्ट्रीय लोकदल हे पक्षांनीही बसपा व काँग्रेसला मागे टाकलं आहे. काँग्रेस व बसपाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते.

समाजवादी पक्ष व राष्ट्रीय लोकदलाची आघाडी होती. 2017 च्या निवडणुकीत सपाला केवळ 47 जागा मिळाल्या आहेत. पण या निवडणुकीत अखिलेश यांनी जोरदार टक्कर देत जवळपास 75 अधिक जागांवर आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. बसपा मात्र या निवडणुकीत कुठेच दिसून आला नाही. माजी मुख्यमंत्री व पक्षाच्या प्रमुख मायावती यांची उत्तर प्रदेशातील ताकद आता नावापुरतीच उरल्याचे दिसते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यात जोर लावला होता. महिलांसह तरूणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या. महिलांना 40 टक्के उमेदवारी दिली. पण त्याचा फारसा प्रभाव मतदारांना पडल्याचे दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com