UP Election Result : भाजप खासदाराच्याच वडिलांचा दारूण पराभव

उत्तर प्रदेशात निवडणुकीआधी भाजपला रामराम ठोकत काही नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.
Sanghmitra Maurya, Swami Prasad Maurya
Sanghmitra Maurya, Swami Prasad MauryaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात निवडणुकीआधी (UP Election 2022) भाजपला रामराम ठोकत काही नेत्यांनी समाजवादी पक्षात (Samajwadi Party) प्रवेश केला होता. त्यामध्ये पाच वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांचाही समावेश होता. पण त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य (Sanghmitra Maurya) या भाजपच्या खासदार आहेत. मौर्य यांच्यासोबत भाजप सोडलेले धर्मसिंग सैनी यांचाही पराभव झाला आहे. दारा सिंह चौहान यांनी मात्र पुन्हा आमदार बनले आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा फाजिलनगर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे (BJP) सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी त्यांचा दारूण पराभव केला. मौर्य यांना 29 हजार 647 तर कुशवाहा यांना जवळपास 56 हजार मतं मिळाली. मौर्य यांनी त्यांचा पडरौना मतदारसंघ सोडत फाजिलनगर म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप नेत्यांनी सांगितले तरी आपल्या वडिलांविरोधात प्रचार करणार नाही, असं संघमित्रा यांनी स्पष्ट केलं होतं. त्या उघडपणे भाजपविरोधात काम करत होत्या. त्यामुळे भाजपनेही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता.

Sanghmitra Maurya, Swami Prasad Maurya
विरोधकांचं पानिपत; लखीमपूर खीरीनं दिला जोरदार झटका

मौर्य यांनी पराभवानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. जनादेशाचा सन्मान करतो. निवडणूक हरलो आहे, हिंमत नाही. संघर्ष सुरूच राहील, असं मौर्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मौर्य यांच्यासोबत बाहेर पडलेले सैनी यांचा नकुड मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांना भाजपचे मुकेश चौधरी यांनी पराभूत केले. त्याचप्रमाणे दारा सिंह चौहान यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पण त्यांनी घोसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे विजय कुमार राजभर यांचा चार हजार मतांनी पराभव केला.

लखीमपूर खीरीनं विरोधकांना दिला जोरदार झटका

मागील वर्षी लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात विरोधकांनी भाजपला घेरलं होतं. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालत चिरडल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली होती. मुलाला अटक झाल्यानंतर मंत्र्याच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. या घटनेचा भाजपला निवडणुकीत फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण हे अंदाज फोल ठरवत मतदारांनी विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.

लखीमपूर खीरी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघात भाजपला एकही मतदारसंघात विजय मिळाला नव्हता. या घटनेमुळे यंदाही हेच चित्र पाहायला मिळेल, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर अगदी उलट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. लखीमपूर मतदारसंघासह पलिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, कसता आणि मोहम्मदी या मतदारसंघातील मतदारांनी भाजपलाच साथ दिली आहे. या मतदारसंघामध्ये कुठल्याच पक्षाचा करिष्मा चालला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com