तुरुंगातील मुक्काम मंत्रिपुत्राला महागात; तातडीनं सरकारी रुग्णालयात हलवलं

आशिषला अटक करण्यात आल्यानंतर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याची तब्येत बिघडल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ashish Mishra
Ashish Mishra

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याची तब्येत बिघडल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आशिष हा पोलीस कोठडीत असून, त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याला ताप आल्याने कारागृह प्रशासनाने रुग्णालयात हलवले. त्याची डेंगीची लक्षणे दिसून आल्याने चाचणी करण्यात आली आहे. त्याला डेंगीची लागण झाल्याचा अहवाल मिळाल्याचे समोर येत आहे. लखीमपूर खीरी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनीही याबाबत माहिती देत याला दुजोरा दिला आहे.

या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. काल (ता.२३) तिघांना अटक करण्यात आली असून, यात मोहित त्रिवेदी, रांकू राणा आणि धर्मेंद्र यांचा समावेश आहे. या तिघांची नावे आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. या प्रकरणी सुरवातीला आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे आणि लवकुश राणा या दहा जणांना अटक झाली आहे. आशिष पांडे आणि लवकुश राणा हे दोघे वगळता इतर सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहे.

Ashish Mishra
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात मोठी घडामोड; यूपी पोलिसांची कारवाई

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Ashish Mishra
शशिकला पुन्हा अडचणीत! आता पक्षानेच घेतली पोलिसांकडे धाव

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com