मोदींनी माघार घेतली अन् केंद्रीय मंत्र्यांनी त्यावर ओतलं पाणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागत हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी मात्र, यावर पाणी ओतले आहे.
V.K.Singh and Narendra Modi
V.K.Singh and Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मोदींनी माफी मागत हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. आता केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह (V.K.Singh) यांनी मात्र, यावर पाणी ओतले आहे. त्यांनी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना कारणीभूत ठरल्याचे वक्तव्य करीत याचे श्रेय संघटनांना दिले आहे.

मोदींनी कृषी कायदे मागे घेताना कोणालाही दोष टाकणे टाळले होते. याचबरोबर त्यांनी संपूर्ण देशाची माफीही मागितली होती. परंतु, त्यांचेच सहकारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी आता दोषारोप सुरू करून मोदींच्या परिश्रमावर पाणी फेरले आहे. त्यांनी शेतकरी संघटनांमुळे कायदे मागे घ्यावे लागल्याचे विधान केले आहे. यामुळे एकप्रकारे कायदे मागे घेण्याचे श्रेय त्यांनी शेतकरी संघटनांना दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

व्ही.के.सिंह म्हणाले की, काही वेळा आपल्याला गोष्टी व्यवस्थित माहिती असतात पण आपण अंधपणे दुसऱ्याच्या मागे चालतो. मी शेतकरी नेत्याला विचारले होते की, तुम्ही याला काळे कायदे म्हणता तर यात काळे काय आहे? काळ्या शाईशिवाय यात दुसरे काय काळे आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यानेही सहमती दर्शवली होती. मात्र, कायदे काळेच असल्याची री ओढली होती. शेतकरी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ते छोट्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत नाही. यामुळेच मोदींनी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.

V.K.Singh and Narendra Modi
मोठी घडामोड : तीन मंत्र्यांचे राजीनामे; उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार

कृषी कायदे आणि त्यामुळे शेतकरी आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी वर्षभरानंतर सपशेल शरणागती पत्करत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. तरीही शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. हे तिन्ही कायदे संसदेत माघारी घेतल्यानंर घरी जाण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यातच शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.

V.K.Singh and Narendra Modi
चंद्राबाबू ढसाढसा रडले अन् जगनमोहन रेड्डी म्हणाले, सगळ्या राज्याला माहितीय!

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबरला कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com