अल्पसंख्याक शब्दाला आता भाजपचा आक्षेप; केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह म्हणाले...

काही कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाला अल्प कसं म्हणणार?
Giriraj Singh
Giriraj SinghSarkarnama

नवी दिल्ली : भाजपने (BJP) आता अल्पसंख्याक या शब्दाला विरोध सुरू केला आहे. यासाठी लोकसंख्येतील त्या समाजाच्या प्रमाणाकडे पाहण्याचा निकषही लावला आहे. केंद्रीय मंत्री गिरीरीजसिंह (Giriraj Singh) यांनी अल्पसंख्याक या शब्दाला आक्षेप घेतला आहे. तसेच, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

गिरीराजसिंह म्हणाले की, काही कोटी लोकसंख्या असलेल्या कुठल्याही समाजाला संख्येने अल्प कसं म्हणता येईल? अल्पसंख्यांक शब्दाच्या आडून लांगुलचालनाचे राजकारण होत आहे. असे राजकारण आता थांबविण्याची वेळ आली आहे. संसदेने कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. याचबरोबर विदेशी आक्रमकांच्या छळाची प्रतिके असलेली सर्व चिन्हे त्वरित नामशेष करायला हवीत.

जातीनिहाय जनगणनेला भाजपने पाठिंबा दिलेला नाही. पण बिहारमध्ये एकत्र सत्तेत असल्यामुळं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आग्रहासमोर भाजपनं मौन धारण केलं आहे. त्यामुळे जनगणनेवर भाजपने आता घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. जातीनिहाय जनगणनेचे काम बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा नितीशकुमार यांचा विचार आहे. विरोधी पक्षनेते व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांनही याला पाठिंबा दिलेला आहे.

Giriraj Singh
सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर आप सरकार बॅकफूटवर; गाजावाजा करीत घेतलेला मोठा निर्णय अखेर मागे

जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, पण अशा जनगणनेच्या आडून अवैध बांगलादेशी व रोहिंग्यांना फायदा होऊ नये, अशी भूमिका गिरीराजसिंह यांना घेतली आहे. या घुसखोरांना जातीनिहाय जनगणनेतून बाहेर ठेवावे पण देशातील, विशेषतः मागासवर्गीयांचे लाभ घेणाऱया मुस्लिमांना वगळू नये, अशी मागणी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडे केली आहे. (BJP on Caste based Census)

Giriraj Singh
जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही पण...

जातीनिहाय जनगणनेवर गिरीराजसिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेला आमचा विरोध नाही. परंतु, यातून रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना वगळावे. १९९० मधील आकडेवारीनुसार बिहारच्या ११ जिल्‍हयांत चार लाख घुसखोर राहात होते. आता ही संख्या वाढली असण्याची चिन्हे आहेत. लांगुलचालनाच्या राजकारणात या सर्वांची जनगणना केल्यास त्याला काहीच अर्थ उरणार नाही. या घुसखोरांना देशाचे नागरिक म्हणून मान्यता देणे धोक्याचा इशारा देणारे ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com