कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू...सरकार म्हणतंय, लशीचा संबंध नाहीच

देशभरात मोठा गाजावाजा करीत कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मात्र, लशीच्या सुरक्षिततेवरुन मोठा गदारोळ सुरू आहे.
two health workers died after taking covid shots in three days
two health workers died after taking covid shots in three days

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली असली तरी या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना तीन दिवसांत समोर आल्या आहेत. सरकारने मात्र, या दोघांच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीपासून देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला होता. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला होता. तीन कोटी लोकांना लस मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून 3 लाख 80 हजार जणांना ही लस देण्यात आली आहे. यातील 580 जणांना लस दिल्यानंतर त्रास जाणवला असून, सात जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याचबरोबर लस घेतलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नाही. 

उत्तर प्रदेशमध्ये आता कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महिपाल सिंह (वय ४६) असे मृत वॉर्डबॉयचे नाव असून, ते मोरादाबाद जिल्हा रुग्णालयात सेवेत होते. त्यांना 16 जानेवारीला लस दिल्यानंतर चोवीस तासांनी म्हणजे 17 जानेवारीला त्यांची तब्येत बिघडली आणि रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना झालेला नव्हता आणि लशीची अन्य बाधा झाल्याचेही निष्पन्न झालेले नाही. त्यांचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

तसेच, कर्नाटकातही कोरोना लस घेतलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तो 43 वर्षांचा होता. तो कामावर आल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले. नंतर तो खाली कोसळला. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले मात्र, त्याचा जीव वाचवता आला नाही. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. 

केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com