निलंबित होताच सदस्यानं सरकारलाच आणलं अडचणीत

सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. आता 13 व्या सदस्याला निलंबित करण्यात आले आहे.
Derek O Brian

Derek O Brian

Sarkarnama

नवी दिल्ली : संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) सुरूवातच वादळी ठरली आहे. मागील अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 सदस्यांना या अधिवेशन काळासाठी निलंबित करून मोदी सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला होता. आता तृणमूल काँग्रेसचे (TMC) सदस्य डेरेक ओब्रायन यांच्या रुपाने तेराव्या सदस्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी काहीही न करता निलंबन केल्याचा आरोप करीत सरकारला अडचणीत आणले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (11 ऑगस्ट) झालेल्या गोंधळप्रकरणी 12 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आता तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी त्यांनी निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी नियमपुस्तिका सभागृहाच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी ही घटना घडली आहे.

डेरेक ओब्रायन यांनी सर्व आरोप नाकारले आहेत. सरकारने जाणीवपूर्वक निलंबन केले असून, आरोप सिद्ध करणारे फुटेज द्यावे, असे आव्हान दिले आहे. सरकारने याला अद्याप उत्तर दिलेले नाही. ओब्रायन म्हणाले की, कुणीतरी नियमपुस्तिका फेकली? खरचं का? संसदेला आग लागली आहे. संसदेभोवती चाकू घेऊन फिरणारे मोदी आणि शहा लोकशाहीचा खून करीत आहेत. संसदेचे 12 सदस्य बाहेर बसले आहेत. सातशे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. हे कुणी केले.

<div class="paragraphs"><p>Derek O Brian</p></div>
विरोधकांना मोठा धक्का! अधिवेशनात आता तेरावा सदस्य निलंबित

सभागृहात बेशिस्त वर्तनाचे कारण देत 12 खासदारांना चालू अधिवेशनात निलंबन करण्यात आले होते. त्यांना आता अधिवेशन संपेपर्यंत कामकाजात सहभाग घेता येत नाही. या बारा जणांमध्ये शिवेसेनेचे खासदार अनिल देसाई व प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>Derek O Brian</p></div>
वडिलांच्या विरोधात लढणार का? यावर राणेंचे पुत्र म्हणाले, हा आमच्या घरचा प्रश्न!

पावसाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या दिवशी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. राज्यसभेत विमा विधेयक सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला होता. त्यावेळी सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते. त्यावरूनही मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मार्शल आणि खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com