
Man Ki Baat at PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा (३० एप्रिल) 100 वा भाग होता. (This is a spiritual journey for me; PM Modi emotional in 'Mann Ki Baat')
मला तुमच्या सर्वांची हजारो पत्रे आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रे वाचण्याचा प्रयत्न केला आहे. ही पत्रे वाचून माझे मन भावूक झाले.मन की बातचे १०० भाग पूर्ण केल्याबद्दल लोकांनी माझे अभिनंदन केले आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Narendra Modi News)
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण केली. ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आम्ही सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी 'मन की बात'चा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, 'मन की बात' हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. यातील सकारात्मकता साजरी करतो. यात लोकसहभागही आपण साजरा करतो. कधी-कधी 'मन की बात' होऊन इतके महिने आणि इतकी वर्षे उलटून गेली यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.प्रत्येक एपिसोड खास होता, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. (National Politics)
मन की बातच्या माध्यमातून किती चळवळी सुरू झाल्या. 'मन की बात'शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचे मिशन मन की बातनेच सुरू झाले. आपल्या भारतीय कुत्र्याबद्दल म्हणजेच देशी कुत्र्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बात'नेच झाली. या असे प्रत्येक प्रयत्न समाजात परिवर्तनाचे कारण बनले असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
तसेच, माझ्यासाठी 'मन की बात' म्हणजे देवासारख्या जनतेच्या चरणी प्रसादाचे ताट आहे. 'मन की बात' हा माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास झाला आहे. 'मन की बात' हा स्वत:पासून समाजापर्यंतचा प्रवास आहे. 'मन की बात' हा अहंकार ते स्वत्वाचा प्रवास आहे. आज देशात पर्यटन खूप वेगाने वाढत आहे. आपली नैसर्गिक संसाधने, नद्या, पर्वत, तलाव किंवा आपली तीर्थक्षेत्रे असोत, त्यांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी मदत होणार आहे.
पंतप्रधान म्हणाले, मी नेहमी म्हणतो की परदेशात जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे. हे ठिकाण तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्यातील नसावे. तुमच्या राज्याबाहेरील इतर कोणत्याही राज्यातील असणे आवश्यक असल्याचही यावेळी नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलंय .
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.