Election Commission News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि सीपीआयला देखील मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांना 2019 मध्ये नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, असा सवाल त्यामध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढून घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोगासमोर पक्षाची भूमिका प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मांडली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जुलै २०१९ मध्येच देशातील या पक्षांना पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना असल्यामुळे त्या पत्रावर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे त्या संदर्भात नंतर या पक्षांनी आयोगासमोर बाजू मांडली होती. मात्र, आयोगाने आज त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केली. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पाच खासदार आहेत. त्याच प्रमाणे अनेक राज्यात राष्ट्रवादीने निवडणुका लढवल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष आहे. तसेच नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात आमदार आहेत. 2014 नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तो धोक्यात आला. 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणूक लढली होती. नागालँडमध्ये पक्षाने केलेल्या कामगिरीनंतरही राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकत नाही हे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याचे निकष काय असतात?
लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये २ टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजे. पक्षाला ४ किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे गरजेचे असे. यातील एक निकष पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला की पक्षाला देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. तसेच, राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष हा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.