
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला नबाम रेबिया प्रकरण लागू होते की नाही, हे पाहण्यासाठी ते प्रकरण सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पहिलीच मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. (Thackeray group's decision to give Namab Rebia case to seven benches is acceptable)
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे वाचन करत आहेत. त्या वाचनात त्यांनी शिवसेनेला पाहिल्यांदाच दिलासा दिलेला आहे.
हे प्रकरण चिकित्सेसाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येईल, असेही चंद्रचूड यांनी आपल्या निकाल वाचनात पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे. सुनावणी सुरू असताना शिवसेनेची ही मागणी न्यायालयाने बाजूला ठेवली होती. मात्र, त्याचा विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज न्यायाधीश चंद्रचूड यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. (Political Web Stories)
दरम्यान, शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले यांची प्रतोद ही नियुक्ती बेकायदेशीर. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हिपचा अधिकार नाही. तो पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षसंघटनेला मिळून आहे, असेही न्यायमूर्तींनी सांगितले आहे. (Political Short Videos)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.