अमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला

दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार सुरू असून फायरींग झाल्याचंही वृत्त आहे.
Tension on Assam and Mizoram state Border after Amit Shahs visit
Tension on Assam and Mizoram state Border after Amit Shahs visit

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार सुरू असून फायरींग झाल्याचंही वृत्त आहे. सरकारी वाहनांवरही हल्ला झाल्याचं समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून एकमेकांबद्दल तक्रार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना टॅग केले. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. (Tension on Assam and Mizoram state Border after Amit Shahs visit)

शहा यांनी नुकतेच आसाममध्ये बोलताना पूर्वेकडील राज्यांमध्ये शांतता असल्यांचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांतच हिंसाचार सुरू झाला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी याबाबत ट्विट करून शहा यांनाच यातून मार्ग काढण्याची विनवणी केली आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडिओही असून त्यात अनेक लोक हातात लाठ्या घेतल्याचे दिसत आहे. 'मिझोरामला परत येताना एका दाम्पत्यावर गुंडांनी हल्ला केला. तसेच तोडफोडही केली. तुम्ही या हिंसक घटनांबाबत कसा न्याय देणार?,' असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर आश्चर्यकारकरीत्या आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या व नागरिकांकडून मिझोराममध्ये लाठीचार्ज करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या, असा आरोपही झोरामथांगा यांनी अन्य एका ट्विटमध्ये केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीही ट्विट करून मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

'आदरणीय झोरामथांगाजी, कोलाबिस (मिझोराम) च्या एसपींनी आम्हाला आमच्या पोस्टवरून हटण्यास सांगितले आहे. तुमचे नागरिक शांत बसत नाही तसेच हिंसा थांबवत नाहीत, तोपर्यंत पोस्ट हटवावी, असं एसपींनी म्हटलं आहे. अशा स्थिती आम्ही सरकार कसं चालवू. तुम्ही लवकरात लवकर दखल घ्याल, अशी अपेक्षा आहे,' असं बिस्वा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आसाममध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. तर मिझोराममध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेत आहे. 

दरम्यान, मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. मिझोरामप्रमाणे आसामच्या सीमेवरून मेघालय आणि अरूणालल प्रदेश या राज्यांशीही वाद आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com