मोदींचा आदेश आला अन् आरोग्यमंत्र्यांनी कोरोना लस घेण्याचा बेत ऐनवेळी केला रद्द!

देशभरात आज मोठा गाजावाजा करीत कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी ऐनवेळी लस घेणे रद्द केल्याचे समोर आले आहे.
telangana health minister etala rajender decides to not take corona vaccine
telangana health minister etala rajender decides to not take corona vaccine

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला आज देशात सुरवात झाली. मात्र, आरोग्यमंत्र्यांनीच कोरोनाची लस घेण्याचा निर्णय ऐनवेळी बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सक्त सूचना कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास आज देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला. तीन कोटी लोकांना लस मोफत देणार येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.

मोदी म्हणाले की,  खूप दिवसापासून कोरोना लशीची प्रतिक्षा होती. प्रथम कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मदत देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खर्च सरकार उचलणार आहे. कोरोना काळात सरकारने अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवनाला महत्व दिले.'' 

दरम्यान, तेलंगणमध्ये आरोग्यमंत्री एटाला राजेंदर हे पहिल्यांदा राज्यात लस घेणार होते. परंतु, त्यांना ऐनवेळी लस घेण्याचा निर्णय रद्द केला. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सक्त सूचना होत्या. ते म्हणाले की, पहिल्यांदा आरोग्यसेवकांनी लस घ्यावी, अशी सक्त सूचना पंतप्रधानांनी केली होती. त्याला अनुसरून मी लस घेण्याचा निर्णय रद्द केला. 

आरोग्यमंत्री राजेंदर यांनी तेलंगणमध्ये पहिली लस ते घेतील, असे जाहीर केले होते. लशीविषयी जनतेच्या मनात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु, आज मोदींनी पहिल्यांदा आरोग्य सेवकांना ही लस द्यावी, अशी सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली. याचबरोबर लस घेण्यासाठी राजकारण्यांनी रांगेत घुसू नये, असा टोमणाही मोदींनी मारला होता. यामुळे अखेर राजेंदर यांनी लस घेण्याचा निर्णय रद्द केला. 

केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com