जातीनिहाय जनगणनेसाठी केवळ एक रकाना वाढवला तरी काम होईल!

जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने आजपंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
tejashwi yadav says only one extra column needed for caste census
tejashwi yadav says only one extra column needed for caste census

नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या (Caste Census) मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यासह आज 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. या वेळी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हेसुद्धा उपस्थित होते. जनगणनेच्या अर्जात केवळ एक जातीचा अतिरिक्त रकाना देऊन जातीनिहाय जनणना करता येईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

नितीशकुमार यांच्यासोबत 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने आज मोदींची भेट घेतली. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाजपचे जनकराम, काँग्रेस नेते अजित शर्मा, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधींचा समावेश होता. या शिष्टमंडळाच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. आता बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 

मोदींची भेट झाल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, आमच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. जातीनिहाय जनगणनेची बिहार राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्वाची आहे. प्राणी आणि पक्ष्यांची गणना होऊ शकते तर लोकांचीही गणना होऊ शकते. जातीनिहाय जनगणना ही ऐतिहासिक आणि गरीबांना हात देणारी ठरेल. आता आम्हाला मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची भीती केंद्राला वाटत असेल. तर सरकारने धर्माच्या आधारावर माहिती गोळा करणेही थांबवावे. जनगणनेच्या अर्जावर धर्म आणि एससी/एसटी हे रकाने असतात. जातीनिहाय जनगणनेसाठी त्यात केवळ जातीचा एक कॉलम अतिरिक्त टाकावा लागेल. 

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर नितीश यांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्राला अनेक दिवस मोदींनी उत्तर दिले नव्हते. यामुळे नितीश यांनी नुकतीच उघड नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मी लिहिलेल्या पत्रावर अद्याप त्यांचे उत्तर मिळालेले नाही. आम्हाला जातीवर आधारित जनगणना हवी आहे. ही आमची जुनीच मागणी आहे. अशा जनगणनेमुळे सर्व जातींची नेमकी लोकसंख्या समोर येईल. यानुसार मग सरकारला धोरणे आखता येतील. हे मी देशाच्या भल्यासाठीच सांगत आहे. 

पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या जवळ येऊ लागले आहेत. याचबरोबर तेजस्वी यादवही नितीशकुमारांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com