मंत्र्यानं राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना आली खडबडून जाग

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
Swami Prasad Maurya, Keshav Prasad Maurya
Swami Prasad Maurya, Keshav Prasad MauryaSarkarnama

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जोरदार झटका बसला आहे. कॅबिनेट मंत्र्याने पक्षाचा राजीनामा देत मंगळवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. आणखी काही आमदार समाजवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे. हे राजीनामासत्र सुरू झाल्यानंतर भाजप खडबडून जागे झाले आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारण आता चांगलंच तापलं आहे. भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानंतर काही तासांतच स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना खडबडून जाग आली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

Swami Prasad Maurya, Keshav Prasad Maurya
भाजप अडचणीत : मुख्यमंत्री योगींचे दिल्लीत पाऊल अन् मंत्र्यानं दिला झटका

केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे की, स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला याची माहिती नाही. आप एकत्रित बसून चर्चा करण्याचे आवाहन त्यांना करतो. कारण घाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, असं मौर्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पण त्यांच्या ट्विट आधीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्र्यांचा अखेरचा प्रयत्नही अपयशी ठरला.

Swami Prasad Maurya, Keshav Prasad Maurya
पक्ष बदलला म्हणून निवडणूक हरले; भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांची कबुली

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे पक्षात स्वागत केले. ते योगी सरकारमध्ये कामगार मंत्री होते.राजीनामा दिल्यानंतर मौर्य म्हणाले, मंत्री असताना विपरीत स्थिती आणि विचारधारेमध्ये राहून खूप काम केले आहे. मात्र दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरूण आणि छोटे व मध्यम व्यापाऱ्यांकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केलं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केला.

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच पहिला मोठा धक्का बसला. दिल्लीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुढील एक दोन दिवसांत नावांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपला आणखी धक्के बसू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com